आता 18 सप्टेंबर ऐवजी 21 सप्टेंबर रोजी होणार बैठक.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर आणि काही तालुक्यांच्या ठिकाणी कोरोना समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवसाच्या “जनता कर्फ्यू” लावण्यासाठी पालकमंत्री आ. विजय वडेट्टीवार हे गंभीरपणे विचार करीत आहेत. त्या साठी शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतुुुु ती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
आधार न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक यांनी चंद्रपूर महापौर सौ. राखीताई कंर्चलवार यांच्यासोबत फोनवर संपर्क साधल्या नंतर मिळालेल्या माहितीनुसार उद्या 18 सप्टेंबर रोजी होणारी ही बैठक पुढे ढकलण्यात आली. असुन आता ही बैठक 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.