बिघाड असलेल्या वीज मीटर ला बदलवून देण्यास वीज वितरण कंपनी ला लागले दोन वर्षे.
दोन वर्षाचे काम केले दोन दिवसात मडावी कुटुंबाने मानले प्रहार चे आभार.
Bhairav Diwase. Sep 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- आवळपुर येथील रहिवासी अशोक मडावी दूध डेअरी जवळ अनेक वर्षा पासून वास्तव्यास आहे मागील दोन वर्षा पासून त्यांच्या घरच्या वीज मीटर मध्ये बिघाड आली मडावी यांनी रीतसर अर्ज करून वीज वितरण कार्यालय गडचांदूर येथे वीज मीटर बदलवून देण्यास मागितले पण साधारण मजूर असल्या कारणाने वीज वितरण कार्यालयाने त्या कडे डोळेझाक केली कार्यालयात किती तरी चकरा मारून शेवटी मडावी हे हवालदिल झाले पण त्यांना काही वीज मीटर बदलून नाही मिळाले दर महिन्याला एव्हरेज बिल पाठवून त्यांना वीज बिल भरण्यास भाग पाडत अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल अशी बतावणी करून त्यांना वीज बिल सुद्धा जबनरदस्तीने भरायला लावायचे। अश्यातच मडावी याना प्रहार जनशक्ती पक्ष जनसम्पर्क कार्यलय गडचांदूर चे सतिश बिडकर यांची माहिती मिळाली मडावी यांनी प्रहार चे माजी तालुका अध्यक्ष सतिश बिडकर याना फोन करून सम्पूर्ण माहिती दिली बिडकर यांनी मडावी याना प्रहार कार्यालयात वीज वितरण कार्यलयाला केलेल्या अर्ज व पत्र घेऊन बोलाविले.
कोणत्याही सामान्य माणसाचे शेतकऱ्याचे काम जर कोणी अधिकारी व कर्मचारी करून देत नसेल किंवा लाच मागत असेल तर खालील नंबर वर सम्पर्क करा असे बिडकर यांनी सामान्य नागरिकाला म्हटले पण कोणीही शेतकरी सामान्य माणूस यांनी या अधिकारी व कर्मचारी याना बळी पडू नये सर्व अधिकारी व कर्मचारी हे आपले नौकर आहेत याना धडा आपणच शिकवू असे सतिश बिडकर यांनी म्हटले
9834083738