(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील जनता कर्फ्यूचा परिणाम आता जाणवायला लागला असुन मागील 2 दिवसात कमी असलेली बाधितांची संख्या आज अजुन खालावली असुन आज बर्याच दिवसानंतर चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 100 पेक्षा कमी बाधितांची नोंद झाली असुन आज हा आकडा 92 वर आला आहे.
मात्र आज 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
1) मास्क वापरत रहावे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करावे.
2) पुरेसे गरम पाणी प्या.
3) आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्या.
4) घरी किंवा ऑफिसमध्ये हळू हळू काम सुरू करा.
5) पुरेशी झोप आणि आराम करा.
6) योगासन करा
7) दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा.
8) डॉक्टरांनी शिफारस केलेले श्वास घेण्याचे व्यायाम करा.
9) सकाळी आणि संध्याकाळी चाला.
10) सहज पचले असा आहार घ्या.
11) धूम्रपान आणि मद्यपान पासून अंतर ठेवा.