जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे आवाहन.
चंद्रपूर:- "ज्या महिला कोरोना दि. ०१. मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे. अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता/जिजाऊ या योजनेंतर्गत रु. ५०,०००/ - (रु. पन्नास हजार फक्त) प्रति लाभार्थी मिळतील."
अशी पोष्ट सोशल मिडीयाद्वारे व्हाट्स अॅपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरची पोष्ट ही खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना आपल्या विभागामार्फत कार्यान्वित नाही. तथापि या मेसेजमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, अशी कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जात नसून या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.