चंद्रपूर:- जिल्ह्यात मागील 24 तासात 1067 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 687 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 19 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 75 हजार 885 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 63 हजार 818 झाली आहे. सध्या 10 हजार 856 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 29 हजार 160 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 48 हजार 641 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 1211 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1120 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 38, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 687 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 188, चंद्रपूर तालुका 23, बल्लारपूर 87, भद्रावती 73, ब्रम्हपुरी 26, नागभिड 20, सिंदेवाही 13, मूल 59, सावली 27, पोंभूर्णा 06, गोंडपिपरी 31, राजूरा 23, चिमूर 09, वरोरा 30, कोरपना 55, जिवती 00 व इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.