Top News

सरळ सेवा पद भरती नव्याने घ्या; विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांच्या वतीने ब्रम्हपुरी तहसीलदारांना निवेदन. #Recruitment



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र सरळ सेवा पद भरती त्वरित नव्याने भरणे बाबत ब्रम्हपुरी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
आपल्या राज्यामध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. म्हणून सरकार महोदय गेल्या तीन वर्षांपासून नोकरभरती प्रक्रिया बंद केली आहे. व त्यामुळे बेरोजगारांची महाराष्ट्रामध्ये संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यांचा परिणाम युवा बेरोजगारांवर होत आहे. तसेच युवक मानसिक रित्या खचत चालले आहे व काही आत्महत्या सुद्धा केले आहे.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये व्यवसाय, उद्योगधंदे सुरळीत सुरू आहेत. तर मग स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र बंद का ? महोदय विदयार्थ्यांचे मरण हेच महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे काय हे तरी सादर करा नाही तर सरळसेवा भर्ती त्वरित चालू करा भर्ती न चालू केल्यास विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे म्हणून महोदय याचा उद्रेक होण्याचा आधीच आपण सर्व विभाग निहाय नव्याने पद भरती चालू करून परीक्षांची तारीख जाहीर करावी व इतर परीक्षांच्या जाहिराती व वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे व सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्याल ही विनंती .आमची मागणी १५ दिवसात मान्य न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करेल.या आंदोलनामध्ये काही हिंसक घटना घडल्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. अशी घोषणा सुदामभाऊ राठोड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर,विशाल राठोड, शुभम वालदे, मयूर मेश्राम, कुंदन लांजेवार, अमर गाडगे, संदीप कामडी व निखिल डांगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.  #Recruitment


H


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने