Top News

विज पडून 25 शेळ्यांचा मृत्यू, तर यात दोन इसम गंभीर जखमी. #Lightningstrikes


जिवती:- जिवती तालुक्यातील चिखली बु येथे सततच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

🤦‍♂️व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्व्हर झाला होता डाऊन!

अश्यातच नागेश रामशाव कोटनाके (अंदाजे २१ वर्ष) व कमलबाई धर्मराव मेश्राम (अंदाजे ३९ वर्ष) यांनी आपल्याकडे असलेल्या शेळ्या चारायला नेले असता अचानक सांयकाळी 5.30 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. विजेच्या कडकडाटाने घाबरून आपल्या शेळ्या घराकडे घेऊन निघाले असता विज पडुन 25 शेळ्यांचा जागीच मृत्यु झाला. तर यात दोन जण गंभीर जखमी झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय चंद्रपुर येथे हलविण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने