(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अबुंजा फाऊंडेशनच्या वतीने वनराई बंधारा बांधुन पाणी आढवा पाणी जिरवा या मोहिमेला जिवती येथुन सुरुवात करण्यात आली यात पाणीचा साठा एकत्र जमा करुन पाणी थाबंवने म्हणजेच आज काळाची गरज आहे व हा उपक्रम आम्ही हाती घेऊन या मोहिमेला यशस्वीरित्या पारपाडण्याच प्रयत्न करु अश्या विचारधारा अगी घेऊन अबुंजा फाऊंडेशनच्या वतीने जिवती येथे वनराई बंधारा पाणी आढवा पाणी जिरवा या मोहिमेला सुरुवात केली आहे.
या वेळी अबुंजा फाऊंडेशनचे जिवती कर्मचारी प्रफुल विधाते वासुदेव जाधव मोकिंद राठोड व सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड सुनिल राठोड गोविंद गोरे नितेश करे क्रिष्णा चव्हाण दामाजी मस्के अरविंद चव्हाण बालाजी राठोड आदींची उपस्थिति होते.