चंद्रपूर:- गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चिंता करू नये. जाऊन मदत देण्याचे जाहीर केले आहे. पावसाळी अधिवशेन संपताच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर येथे दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या क्रांतीभूमीत आयोजित शहीद स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही, आता तेच लोक आम्हाला शहाणपणा सांगत आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी पावसाळी अधिवशेन संपताच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा केली जाईल. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला ७०० रुपये बोनस जाहीर करण्याचा विषय शासनाच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
चिमूरच्या इतिहासावर लघुचित्रपट तयार करा चिमूर क्रांतीचा इतिहास, शहिदांचे बलिदान, स्वातंत्र्यविरांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चिमूरच्या इतिहासावर लघुचित्रपट तयार झाला पाहिजे. यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केली.
अधिवेशनानंतर अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत #chandrapur
Reviewed by Bhairav Diwase
on
मंगळवार, ऑगस्ट १६, २०२२
Rating: 5
(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......
सन्मानचिन्ह
आधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..
प्रतिनिधी पाहिजे....
चंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत