पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase
0

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील शेतकरी पीक संरक्षणासाठी लाकडी खुठे तुरीच्या सभोवताल ठोकली होती. तुरी मळई करण्यासाठी तार व खुटे काढण्यासाठी शेतकरी गेला असता अचानक पाय घसरून खुठ्यासकट बाजूला असणाऱ्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. २२ जानेवारीला रविवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव सोमनाथ शुकनाथ ईस्टाम रा.चेकपिपरी असे आहे.

घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय मोगरे, पोलिस कर्मचारी वंदिराम पाल, जाधव, शांताराम पाल घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचे शव विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे आणण्यात आले.

पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात गोंडपीपरी पोलीस करीत आहे. मृतक सोमनाथ हा अल्पभूदारक शेतकरी असून त्याला पत्नी व तीन मुली असून घरची परिस्थिती हलाकीची असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच रवींद्र खेरकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)