Top News

जिल्हाधिकारी यांचे आदेशाला उपविभागीय अधिकाऱ्यांची दिरंगाई chandrapur


एसडीओ यांना निलंबनाची जयभीम युवा सेना संघटनेची मागणी


चंद्रपुर:- 7 मार्च 2022 नंतर वरोरा उपविभागांतर्गत 20 जमिनींचे भोगवटदार 2 चे 1 मध्ये रूपांतर करण्यात आले आहे, परंतु यापैकी 7 प्रकरणांमध्ये विमा हप्त्याची रक्कम चालानाद्वारे शासकीय खात्यात जमा झालेली नाही तर एका प्रकरणात निश्चित मूल्य 26,73,250 रुपये आहे तर अर्जदाराकडून 13,36,625 रुपये आकारण्यात आले असून ते बाजारमूल्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वरोरा येथील एसडीओ सुभाष शिंदे यांना वरील प्रकरणांमध्ये तीन दिवसांत बाजू मांडण्याचे आदेश दिले.

मात्र आज महिना उलटूनही प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेचा अवमान व दिरंगाई करणाऱ्या एसडीओवर कारवाई करण्याची मागणी जयभीम युवासेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शुभम गवई व माजी सैनिक सागर कोहळे यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 13 डिसेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस दिली यात तीन दिवसांत उत्तर मागितले होते. उत्तर न दिल्यास महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तभंग नियम 1979 चे कलम 3 अन्वये कारवाई करण्याचा इशारा दिला होता. नोटीसमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी एसडीओ सुभाष शिंदे यांना 7 मार्चनंतर भोगवटदार 1 मध्ये केलेल्या जमीन आदेशाच्या प्रत आणि भरलेल्या चालानाद्वारे शासनाच्या खात्यात जमा झालेल्या महसुलाची माहिती मागितली होती. मात्र आजपर्यंत २० पैकी ७ प्रकरणांमध्ये कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने