शैक्षणिक वर्ष संपले तरी रखडलेली शिष्यवृत्ती मिळणार केव्हा? संतप्त विद्यार्थ्यांचा सवाल
चंद्रपूर:- सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांना मोफत तसेच सवलतीच्या दरात शिक्षण घेता यावे, म्हणून केंद्र व राज्य सरकार निव्वळ शिक्षण शुल्काची शिष्यवृत्तीच्या रूपाने परतफेड करण्यासाठी कोट्यवधी रुपये देत असले, पण प्रत्यक्षात याचा लाभ गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी १-२ वर्षे लागतात. शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्तीची रक्कम मिळेना’ शिष्यवृत्तीची रक्कम केव्हा मिळेल? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी सरकारला विचारला आहे. शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी महाविद्यालय चक्रा मारावे लागत आहे.