पोलीस कर्मचाऱ्याच्या भावाची नक्षल्यांकडून हत्या! #Murder

Bhairav Diwase
1 minute read
छत्तीसगड:- छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाचे अपहरण करून हत्या केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री जिल्ह्यातील ओरछा गावातील बटुमपारा चौकात 30 वर्षीय सन्नू उसेंडीचा मृतदेह सापडला.


 उसेंडी हा राज्य पोलिसांच्या बस्तर फायटर्सच्या एका कॉन्स्टेबलचा भाऊ होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोहकामेट्टा भागातील रहिवासी उसेंडी नारायणपूर शहरात राहत होता आणि त्याचे चहाचे दुकान होते. त्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, 28 जून रोजी नारायणपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या कोहकामेटाजवळील कुतुल गावातील स्थानिक बाजारातून उसेंडीचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांना संशय होता की उसेंडी हा पोलिसांचा खबऱ्या होता आणि म्हणून त्यांनी त्याची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह कुतुलपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या ओरछा येथे फेकून दिला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.