4 दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचे शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे आश्वासन.
Bhairav Diwase. April 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन मुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे , तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याकड़े केली आहे. सदर प्रकरणी येत्या 4 दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
दहावीचा भुगोलाचा पेपर दि. 23 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार होता , मात्र कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर रदद करण्यात आला. आता तर लॉकडाउन मुळे व कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे हा पेपर सध्या घेणे शक्य सुद्धा नाही . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे अशी भूमिका आ . मुनगंटीवार यांनी प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.