स्व. निखिल बुरांडे (पॅरा कमांडो) यांनी गळफास घेऊन केली होती आत्महत्या.
Bhairav Diwase. March 19, 2021
स्व. निखिल श्रावण बुरांडे (पॅरा कमांडो) यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील मानोरा या गावातील रहिवासी स्व. निखिल श्रावण बुरांडे (पॅरा कमांडो) यांनी दि. 17 मार्चला सकाळच्या सुमारास उत्तर प्रदेशातील आग्रा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. स्व निखिलने आत्महत्या का केली? हे अजून अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
हि घटना बुरांडे परीवारांना कळताच कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. निखिलच्या जाण्याने कुटुंबाला धक्काच बसला. मानोरा गावात शोककळा पसरली होती. आज दि. 19 मार्चला स्व. निखिलच्या पार्थिवावर मानोरा येथे सायंकाळच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आला.