Top News

लोकशाहीला काळीमा फासणारा दिवस, कोरोनाच्या काळात दिशाभूल करणारा निर्णय:- माजी आमदार अँड.संजय धोटे.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- महाविकास आघाडी सरकार ने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी निर्णय उठवून जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील कोरोणाचे पार्श्वभूमीवर दुख:त धक्कादायक कार्य केलेले आहेत.
वास्तविक बंदी करताना ग्रामपंचायत तथा दारु बंदी समितीने ठराव व अवहाल देऊन दारू बंदी चा लोकशाही ला समर्पित करित निर्णय घेतला होता. परंतु या सरकारने लोकशाही ला काळिमा फासत असत जनतेच्या भावानाची दिशाभूल केलेले आहेत.
सरकारच्या वुत्तीला साजेल असा निर्णय मणावा लागेल. नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या काही मध्यातरी वाजे प्रकरण व महिला हिसाचाराचे प्रकरण तथा या वैतिरिक्त अनेक प्रकरण उद्यास आले महाराष्ट्र सरकार ला वाढत्या कोरोणाचे रुग्णांना लसीकरण वा अन्य सुविधा उपलब्ध करण्यास यावरून तरीही लक्षात येते की कोणताही रस नाहीत, उलट हे सरकार लोकांच्या जिवाशी खेळण्याचे उपद्व्याप करित आहेत
महाविकास आघाडी सरकार मधिल बहुतांश व्यक्ती वा सदस्यांकडे दारु लायसन्स असल्याने हा घातक निर्णय यांच्या हितासाठी घेतल्याचे निदर्शनास येत आहेत. कदाचित अस मणाव लागेल "जहर पिणे वाला अकेला मरता है और शराब पिणे वाला पुरे परिवार के साथ मरता है।" ह्या वाक्याला कदाचित महाविकास आघाडी सरकार सत्यात उतरवत असेल. हे हास्यास्पद आहेत.
या सरकारला कदाचित चंद्रपूर जिल्हा दिसला असेल त्या सोबतच गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील दारू बंदी का दिसली नाहीत हा प्रश्न भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
हा निर्णय घेताना राज्य सरकारने दिलेले अवैध दारू विक्री व गुन्हेगारी हे कारण समोर करित बंदी उठविल्याचे सांगितले परंतु हे सरकार च्या कार्यक्षेमतेचे , स्वतः चे पाप दळवण्याचे घोत्तक कार्य केले आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून महिलांच्या विरोधात आहेत. कोरोणाचे काळात लोकांना विरोध करण्यास संधी मिळू नयेत म्हणून हा त्वरित निर्णय घेण्यात आला आहे. लोकांचा व महिलांचा प्रंचड विरोध असताना हा आजचा दिवस इतिहासात काळिमा फासणारा दिवस ठरणार आहेत. असे मत मा.आमदार अँड.संजय धोटे यांनी व्यक्त केले आहे.
महाविकस आघाडीतील सत्ताधार्यना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संकट काळात वैद्यकिय यंत्रणा मजबूत करणे आणि त्याला अजून बळकट करण्या करीता कदाचित वेळ नसेल पण दारू बंदी उठवण्याच्या निर्णयकरीता नकीच वेळ मिळतोय, दारू बंदी उठवणे हा निर्णय अतिशय चुकीच्या आहे या निर्णय चा भारतीय जनता पक्ष राजुरा च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करित आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने