सृजन नागरिक मंच राजुरा यांच्या माणसापासुन माणसापर्यंत मोहीमे अंतर्गत झालीगुडा येथिल गरजूंना कपडे वाटप.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- सृजन नागरिक मंच राजुरा यांच्या मानसापासुन मानसापर्यंत मोहीमे अंतर्गत अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आपण समाजाचे काही देणे लागतो आपल्याकडुन फुल नाही तर कमीत कमी फुलांची पाकळी म्हणून समाजातील गरीब आणि गरजू व्यक्तींना व्हावी या भावनेतून जिवती तालुक्यातील झालीगुडा या गावी गरजुंना कपडे वाटप करण्यात आले या उपक्रमात सृजन नागरिक मंच राजुराचे श्नी मिलिंद गड्डमवार अंकुश शेळके गोविंद गोरे अक्षय शेळके व गावातील सर्व प्रतिष्ठीत उपस्थित होते.