Top News

अतिवृष्टीमुळे गावातील शेतीची व घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मौका पंचनामा करून तात्काळ मदत द्या- सुदामभाऊ राठोड यांची मागणी #Damaged



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- सदर निवेदन जिवती तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले. निवेदन देतावेळी विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड, सोशल मीडिया अध्यक्ष विशाल राठोड, जिवती तालुका युवा आघाडी अध्यक्ष अरविंद चव्हाण, युवा आघाडी जिवती शहर अध्यक्ष विनोद पवार, प्रदीप सोयाम, राजेश कदम, सुनील शेळके, उध्दव गोतावळे, करण चव्हाण व जिवती तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
       मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे संभोधण्यात आले की, जिवती तालुक्यामध्ये अतिवृषठी मुळे शेतीची आणि घराची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे तरी मुख्यमंत्री महोदय आपण जिवती तालुक्यामध्ये लक्ष घालून तात्काळ प्रति हेक्टर ५०,०००/-  रुपये आणि ज्यांच्या घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांना प्रति घर २,००,०००/-  ( अक्षरी - दोन लाख रुपये ) रुपयाची मदत आपण तात्काळ द्याल. कारण महोदय या पावसामुळे शेतीमधील उभा पीक वाहून गेले, आणि घर सुद्धा बुडून गेले व घरातील अन्न धान्य कपडे लते सर्व वाहून गेले आहे. या अतिवृष्टी मुळे शेतकरी कष्टकऱ्यांचे संसार उघड्यावर आलेले आहे.म्हणून त्यांना आपल्याकडून मदतीची आशा आहे.
        आपण मौका पंचनामा करून तात्काळ पीडितांना मदत द्याल ही विनंती. 15 दिवसाच्या आत मदत जाहीर न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुदाम राठोड यांनी दिला आहे.
#Damaged

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने