कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू. #Death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी 38 वर्षीय बालाजी सदाशिव बोरकुटे या तरुण शेतकऱ्याचा 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता शेतात कीटकनाशक फवारणी करताना अचानक मृत्यू झाला. शेतकरी कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करत होता? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
शेतकरी शेतात पडलेला आढळला. ग्रामस्थांनी त्याला प्राथमिक उपचारांसाठी चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉक्टरांनी शेतकऱ्याला मृत घोषित केले. हा शेतकरी अल्पसंख्याक आहे आणि त्याची उपजीविका शेतीवर अवलंबून होती.माहिती मिळताच ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विरूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बीट हवालदार कुरसंगे अधिक तपास करत आहेत.
शेतकरी कुटुंबात आई-वडील, मुलगा, मुलगी, पत्नी असा परीवार आहे. घरात कमावणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंब संकटात आले आहे. सरकारकडून त्याच्या कुटुंबाला तातडीने मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.