Gondwana Ganatantra Party: पुतळे, स्मारके आणि शेतकऱ्यांचा मोबदला; गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या मागण्या

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडवाना गणतंत्र पक्षाने स्थानिक प्रशासनावर आदिवासींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. जर प्रशासनाने या समस्या सोडवल्या नाहीत तर जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत नामदेव शेडमाके यांनी अनेक मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये ऐतिहासिक आणि आर्थिक बाबींचा समावेश आहे.

स्मारके आणि पुतळे:

गिरनार चौकात क्रांतिकारी शहीद बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांचे स्मारक आणि पुतळा उभारून चौकाला त्यांचे नाव देणे.

जटपुरा गेटजवळ राजमाता राणी हिराई यांचे स्मारक आणि पुतळा उभारून त्या चौकाला राणी हिराई चौक असे नाव देणे.

चंद्रपूर बसस्थानक परिसरात शेवटचे गोंडराज यादवशाह महाराज आत्राम यांचे स्मारक आणि पुतळा बसवून चौकाला त्यांचे नाव देणे.

शेतकऱ्यांचे प्रश्न:
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, अवलपूर, आणि आसपासच्या शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देणे.
सिमेंट कंपनीकडून सुरू असलेले जबरदस्तीचे खोदकाम तात्काळ थांबवणे.

या पत्रकार परिषदेला बापूजी मडावी, नामदेव शेडमाके, जितू मडावी, राजेंद्र धुर्वे, आणि राजेंद्र मरस्कोल्हे उपस्थित होते. या मागण्यांवर प्रशासन गंभीर नसल्याने आदिवासींमध्ये प्रचंड संताप आहे.