अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या! #Pombhurna

Bhairav Diwase
जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांची तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
पोंभुर्णा:- ९, १० जानेवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतातील कापूस, हरभरा, गहु, तूर, वाटाणा, मक्का, लाखोळी, उडीद, मुंग, मिरची व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या नव्याने आलेल्या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील  नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्यात यावी. अशी मागणी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांची तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी केली आहे.
यावेळी, लक्ष्मण गव्हारे, जयंत पिंपळशेंडे,बंडू नैताम, गजानन मडावी, मंगेश माडे,जनार्धन सातपुते, मंगेश उपरे, चंद्रशेखर झगडकर उपस्थित होते.