राजीव गांधी नगर आझाद चौकातील पडली घरे #chandrapur

Bhairav Diwase
0

आकाश मस्के यांनी परीसरातील नागरीकांशी साधला संवाद

चंद्रपूर:- संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. यातच राजीव गांधी नगर आझाद चौक तेथील अतिवृष्टी मुळे घर पडली. तेथील नागरिकांनी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के यांना संपर्क साधला. आकाश मस्के यांनी त्या परीसरातील नागरीकांशी संवाद साधून धीर दिला.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश मस्के यांनी भाजपा महामंत्री ब्रिजभूषन पाझारे यांना संपर्क केला असता ब्रिजभुषण पाझारे यांनी थोड्याही क्षणाचा विलंब न करता तेथील नागरिकांच्या घराला भेट देउन प्रशासनांना लवकरात लवकर नागरिकांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. पाहणी करताना भाजपा महानगर सचिव सौ. सारिकाताई सदुरकर, भाजपा महानगर सचिव राकेश बोमनवार, अमीत निरांजने भाजपा युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष गणेश कुडे विलास खांडारकर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)