Top News

प्रेमासाठी काय पण... घर सोडून १७८ मुली भुर्र #chandrapur


पालकांनो, पाल्यांकडे लक्ष द्या; ३२ मुलांनीही घर सोडले
चंद्रपूर:- "सोळाव वरीस धोक्याचं ग.... बाई, सोळाव वरीस धोक्याचं... या गाण्याच्या ओळी जिल्ह्यातील अल्पवयीनांना तंतोतंत लागू होताना दिसून येत आहे. आकर्षणाला प्रेम समजून किंवा घरगुती छोट्या वादाला मनावर घेत अनेक लहान मुले-मुली घरून पळून जाण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले आहे. मागील दहा महिन्यांत जिल्ह्यातून १७८ मुली तर ३२ मुले असे एकूण २१० अल्पवयीन घरून भुर्र झाले आहे.
अनेक मुले-मुली शिक्षणासाठी बाहेरगावी जातात. तर काही जणांचे आई-वडील रोजगारासाठी दिवसभर बाहेर जात असतात. ते मुलांना पुरेसा वेळ देत नाही. वयात येत असणाऱ्या मुलींना याच काळात भावनिक आधाराची गरज असते. याचा गैरफायदा घेत अनेकजण अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांचे अपहरण करतात. दहा महिन्यात अपहरण झालेल्या २१० पैकी १२९ मुली व २९ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
१८ वर्षांखालील किती मुले-मुली बेपत्ता

           गायब झाले.  आढळले.  संशोधक 
मुली:-.   १७८.            १२९.           ४९. 
मुले:-      ३२.               २९.            ३. 
प्रेमप्रकरण किंवा कुटुंबातील वाद....

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर आयपीसी कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत असतो

मुलींचा शोध लावल्यानंतर प्रेमप्रकरणातून बहुतांश मुली पळून जात असल्याचे समोर आले आहे

तर काहीजण पालकांनी रागावल्यामुळे स्वतःहून घर सोडले असल्याचे समोर आले आहे.
मुलांवर लक्ष कसे ठेवायचे?

पालकांनी आपल्या मुला-मुलीची मित्रमंडळी कोण आहेत. शाळेत जाऊन आपल्या पाल्याचे वर्तन कसे आहे, हे जाणून घ्याये, आपले पाल्य मोबाइलमध्ये किती वेळ देतात, यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच पालकांनी आपल्या मुला-मुलींसोबत मित्रत्वाप्रमाणे संवाद ठेवणेही गरजेचे आहे.
मागील दहा महिन्यांत जिल्ह्यातून १७८ मुली तर ३२ मुलांच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यापैकी १२९ मुली व २९ मुले शोधण्यात संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आहे. तर काही अपहरणातील मुलांचा एलसीबीने शोध लावला आहे. उर्वरीत प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बाळासाहेब खाडे, पोलिस निरीक्षक
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

#साभार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने