जळगाव:- प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाने भाचीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फक्त भाचीवर नाही तर भाचीच्या नणंदेवररही हल्ला करत जखमी केले आहे. यावल तालुक्यातील पिंप्री या गावात ही घटना घडली आहे. ग्रामस्थांनी भाची आणि तिच्या नंणदेची मामाच्या तावडीतून सुटका करत चोप दिला.
जळगाव जिल्ह्यात प्रेम विवाह केल्याच्या रागातून सख्ख्या मामांनी भाचीवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातल्या पिंप्री या गावात ही घटना घडली आहे. तर भाचीच्या नणंदेवरही हल्ला करत जखमी केले असून ग्रामस्थांनी मात्र नणंद भावजयी या दोघींचीही मामाच्या तावडीतून सुटका करत मामाला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. उमाकांत कोळी असे हल्ला करणाऱ्या मामाचे नाव असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.