कोरपना:- राज्य शासनाच्या निर्देशानुसार १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत ३ ऑगस्ट रोजी “पाणंद/शिवरस्ते मोजणी करून अतिक्रमणमुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड” तसेच महसूल विभागातील लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप हे विषय घेऊन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन कोरपना तालुक्यातील नांरडा गावात दुपारी १२ वाजता करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमास राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली. कोरपना तहसीलदार पल्लवी आखारे उपस्थित होत्या.
कोरपना तालुक्यातील प्रत्येक मंडळातील गावा-गावांमध्ये अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. तसेच अतिक्रमण असलेले पांदण रस्ता त्यांच्यावरील अतिक्रमणे ओळखून अतिक्रमणमुक्तीची कारवाई करण्यात येणार आहे. .झाडांची देखभाल व संरक्षणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला.
लागवडीनंतर झाडांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून दीर्घकालीन संवर्धन शक्य होईल.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास व पर्यावरण संवर्धन एकत्र साधले गेले.
देवराव भोंगळे यांच्या हस्ते संजय गांधी योजनेचे लाभार्थी यांना लाभ मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले.
राज्याच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महसूल विभागाच्या या सप्ताहाचा फायदा आपल्या कोरपना तालुक्याला सर्वदूर झाला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी बोलताना केले.
या कार्यक्रमाला भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, माजी सरपंच वसंता ताजणे, अमोल आसेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते नागोबा उरकूडे, सत्यवान चामाटे, उपसरपंच बाळा पावडे, वनोजा येथील सरपंच दिलीप पाचभाई, कढोली येथील उपसरपंच विनोद डोहे, मंडळ अधिकारी नांदेकर, साज्याचे तलाठी राजकुमार अहिरकर, ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ, पोलीस पाटील नरेश परसुटकर,ग्रा.पं.सदस्य अनिल शेंडे, माजी सरपंच मंगेश लोहे,बापूजी पिंपळकर, अबरार अली, रवी बंडीवार, सचिन आस्वले, तिरुपती कन्नाके, सुशांत आत्राम, नैनेश आत्राम, हर्षल चामाटे, आशिष ढुमणे, प्रणय अतकारे,प्रविण हेपट,रमेश पाटील पावडे,अनिल निरे,मारोती शेंडे,सत्यवान चामाटे, प्रमोद शेंडे,भिकाजी घुगुल, प्रशांत पंदीलवार,सुशांत आत्राम,सागर धुर्वे,खुशाल वऱ्हाटे,अरविंद खाडे, विनोद कुचनकर, निखिल काटवटे, सुदाम लांडे,सतीश काळे , विठ्ठल निमकर, राज्यात रणदिवे, निखिल ताजने,यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.