Top News

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार #Tiger #attack #Tigerattack

वेळवा येथील घटना; वनविभागाचे उपाययोजना तोकडे

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची मालीका थांबेना
पोंभुर्णा:- वेळेवा-पोंभूर्णा मार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या एका महिलेवर रोड लगत दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दिनांक १६ डिसेंबर ला सकाळी ६ वाजता च्या सुमारास पोंभूर्णा-वेळवा मार्गावर घडली. संध्या विलास बावणे वय ३८ वर्ष रा. वेळवा असे मृत महिलेचे नाव असुन ती वेळवा येथील रहिवासी आहे. सदर घटनेमुळे खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.


मागील महिनाभरापासून पोंभूर्णा वेळवा मार्गावर वाघाचा वावर आहे. या परिसरातील शेतकरी व वेळवा वासियांना रस्त्यावर अनेकदा वाघाचे दर्शन झाले आहे. वाघाचे वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत काही दिवसांपासून वनविभागाकडे वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी तक्रार देण्यात आले होते. आज गुरुवारला सकाळी वेळवा येथील महिला संध्या विलास बावणे हि पोंभूर्णा रोडकडे सकाळी फिरायला आली असता पुलीयाच्या बाजूला डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून ठार केले.

महिलेवर हल्ला झाला त्या वेळी फिरायला आलेल्या मुलांनी आरडाओरड केला मात्र तोपर्यंत वाघाने सदर महिलेला लोकांच्या डोळ्या देखत ठार केले. याची माहिती होताच कुटुंबीय, वेळवावासिय व परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.पोंभूर्णा वनविभागाचे कर्मचारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र शवविच्छेदन करण्यासाठी वनविभागाकडून मृतदेह उचलण्यासाठी गेले असता कुटुंबीयांनी व वेळवा व परिसरातील ग्रामस्थांनी मृतदेह उचलू दिला नाही. जोपर्यंत नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात येणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलु देणार नाही अशी भुमिका कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतल्यामुळे बरेच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तब्बल ८ तास मृतदेह तसाच घटनास्थळी ठेवून होता. वनविभागाने नागरिकाचा रोष लक्षात घेता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.मात्र तोडगा निघाला नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मध्यस्थी करून मृतकाच्या कुटुंबांना तत्काळ मदत व कायमस्वरूपी नोकरीची अट घातली. यावेळी मध्य चांदा वनविभागाचे ए.सी.एफ. शर्मा यांनी वरिष्ठांशी चर्चा करून मृतकाच्या कुटुंबातील एकाला नौकरी देण्याच्या पत्रव्यवहार करण्या संबंधित लेखी आश्वासन दिले.
मृतकाचे कुटुंबीयांना तात्काळ मदत म्हणून ५० हजार रोख रक्कम व ४ लक्ष ५० हजार रुपये मृतकाच्या मुलाचे चेक स्वरूपात देण्यात आले. उर्वरित १० लक्ष रूपये लवकर करण्याचे आश्वासन देण्यात आले. सोबतच या वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी ट्रप कॅमेरे व गस्त सुरू करण्यात येणार असल्याचेही ग्वाही वनविभागाकडून देण्यात आली. तणाव शांत झाल्याने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.

यावेळी वनविभागाचे ए.सी.एफ.शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, वनक्षेत्र अधिकारी आनंदराव कोसरे, आदी वनविभाग व पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास वनविभाग करीत आहे.
मृतक महिलेला २ मुले असून मुलगा ८ वीत तर मुलगी ११ वीचे शिक्षण घेत आहेत. आई नसल्याने त्यांचा सांभाळ कोण करणार हा यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे.
आणखी किती बळी

याच वर्षी मार्चमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्यांला वाघाने ठार केले होते. मागच्याच महिण्यात कसरगट्टा येथील कापुस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कविठबोळी शेतशिवारात वाघाने ठार केल्याची घटना घडली हि गोष्ट ताजी असतांनाच आज वेळवा येथे फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली.यामुळे पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वाघाचे वाढते हल्ले वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतशिवारात जायला शेतकरी घाबरत आहे.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान

परिसरातील शेतकऱ्याच्या शेतीचे फारमोठे नुकसान होत असून शेतकरी वाघाच्या भितीने शेतात न जात असल्यामुळे उभे पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने