चंद्रपूर जिल्ह्यातील 4 जणांचा समावेश
मुंबई:- भारतीय जनता पार्टीने बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपाने एक पत्रक जारी करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक दोन नाही तर तब्बल 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी केलल्या नेत्यांची यादीच भाजपाने जारी केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघांमधील नेत्यांचा समावेश आहे.
काय म्हटलं आहे भाजपाने?
महाराष्ट्र भाजपाच्या लेटर हेटवर जारी करण्यात आलेल्या या पत्रावर भाजपाच्या नरिमन पॉइंट कार्यालयाचा पत्ता आहे. "आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असूनही पक्षशिस्त व अनुशासन भंग करण्याचं कृत्य केलं आहे. आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असल्याने आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे," असं भाजपाने या पत्रात म्हटलं आहे. या पत्रकाखाली कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णींची स्वाक्षरी आहे. 37 मतदारसंघांमधील पदाधिकारी आणि नेत्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजपाने हकालपट्टी केलेल्या 40 नेते/पदाधिकाऱ्यांची नावं खालीलप्रमाणे :
चंद्रपूर - ब्रिजभूषण पाझारे, ब्रम्हपूरी - वसंत वरजुरकर, वरोरा - राजू गायकवाड, अतेशाम अली, धुळे ग्रामीण - श्रीकांत करर्ले, सोपान पाटील, जळगाव शहर - मयुर कापसे, आश्विन सोनावणे, अकोट - गजानन महाले, वाशिम - नागेश घोपे, बडनेरा - तुषार भारतीय, अमरावती - जगदीश गुप्ता, अचलपूर - प्रमोद सिंह गडरेल, साकोली - सोमदत्त करंजेकर, आमगाव - शंकर मडावी, उमरखेड - भाविक भगत, नटवरलाल उंतवल, नांदेड उत्तर - वैशाली मिलिंद देशमुख, मिलिंद उतमराव देशमुख, नांदेड दक्षिण - दिलीप वेंकटराव कंदकुर्ते, सुनील साहेबराव मोरे, संजय घोगरे, घणसावंगी - सतीश जगनाथराव घाटगे, जालना - अशोक पांगरकर, गांगापूर - सुरेश सोनावणे, वैजापारू- एकनाथ जाधव, मालेगाव बाह्य - कुणाल शिवाजी सुर्यवंशी, बागलान - आकाश साळुंखे, जयश्री गरुड, नालासोपारा - हरिष भगत, भिवंडी ग्राणी - स्नेहा देवेंद्र पाटील, कल्याण - वरुण सदाशिव पाटील, मागाठणे - गोपाळ जव्हेरी, जोगेश्वरी पूर्वी - धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर, अलिबाग - दिलीप विठ्ठल भोईर, नेवासा - बाळासाहे मुरकुटे, सोलापूर शहर उत्तर - शोभा बनशेट्टी, अक्कलकोट - सुनिल बंडगर, श्रीगोंदा - सुवर्ण पाचपुते, सावंतवाडी - विशाल प्रभाकर परब
पक्षाने बरेच प्रयत्न केले पण...
भारतीय जनता पार्टीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत अनेकांची मनधरणी केली. अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांच्या शिष्टाईला यश आलं. मात्र बऱ्याच मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपाने हे निलंबनाचं टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसत आहे.