चंद्रपूर:- ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत येथील सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयाच्या इमारतीवर ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत १३ अगस्त रोजी महाविद्यालयाच्या इमारतीवर प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ. सतीश कन्नाके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खंडके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. उषा खंडाळे तसेच प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा देऊन शहिदांचे स्मरण झालेच पाहिजे. त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान हा केवळ एक उपक्रम न समजता राष्ट्रभक्तीचे प्रतिक समजून काम करा असे आवाहन यावेळी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.