25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त असणार जनता कर्फ्यु.
पालकमंत्री वडेट्टीवार यांची माहिती.
आज 274 पाॅझिटिव , 4 मृत्यू.
Bhairav Diwase. Sep 21, 2020
चंद्रपूर:- मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे मृतांचा आकड्यात वाढ झाली आहेत. हा वाढत असलेला प्रसार थांबविण्यासाठी व जनतेची सुरक्षा व हित लक्षात घेऊन चंद्रपूर शहरातील व्यापारी संघटना,व सर्वपक्षीय नेत्यांनी 25 सप्टेंबर पासून सात दिवस चंद्रपूर बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार चंद्रपूर शहरातील सर्व दवाखाने, मेडिकल व वैद्यकीय व्यवस्था सुरू राहणार आहेत. या जनता कर्फ्यूला सर्व जनतेने सहकार्य करून यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले:-
अनेक दिवसांपासून कोरोनाच्या काळ्या छायेत नसलेला चंद्रपूर जिल्हा आता समस्याग्रस्त होत आहे. नागपूर, पाठोपाठ आता चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पायबंद घालणे गरजेचे अहे. त्यासाठी नियम कठोर करणे आवश्यक आहे. म्हणूनच जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे.