जिवती तालुक्यातील भूमीहीन शेतकऱ्यांना शेतीचे जमीन पट्टे द्या:- विदर्भ राज्य युवा आघाडी

Bhairav Diwase

विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर, पालकमंत्री चंद्रपुर व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन.
Bhairav Diwase. Oct 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या घेऊन विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर, पालकमंत्री चंद्रपुर व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठवले,
निवेदनाचे विषय असे आहे, जिवती तालुक्यातील भूमीहीन शेतकऱ्यांना शेतीचे जमीन पट्टे द्या अशी मागणी विदर्भ राज्य युवा आघाडी यांनी केली आहे.


जिवती तालुक्यातील शेतकरी वर्ग हे १९५० ते १९५५ पासून शेती व्यवसाय करतात. आणि या शेतीच्या आधारावर त्यांचा उदरनिर्वाह करतात त्यामध्ये निसर्गाच्या आधारावर शेती अवलंबून आहे. त्यामध्ये प्रत्येक वर्षी येणाऱ्या दुष्काळाला दोन हात करण्याचे काम आम्हा शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र शासनाचा कोणताच लाभ उपभोगता येत नाही कारण आमच्याकडे आमचे मालकी हक्काचे जमिनपट्टे नाही आमचे गाव रेवनी मध्ये आहे आमच्याकडून वन कर पण वसुली केली आहे.
                 मग आम्हाला भूमीहीन शेतकऱ्यांना जमीन पट्टे मिळायलाच पाहिजे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर मग शासनाचा पण फर्ज बनतो की आम्हा भूमीहीन शेतकऱ्यांची योग्य दखल घेऊन जमिनीचे योग्य ती रीतसर निरीक्षण करून योग्य शेतकऱ्यांना जमीन पट्टे आपण जिल्हाधिकारी साहेब शासन दरबारी प्रयत्न करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्याल हीच विनंती 
                 येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची जमीन पट्टेची दखल शासन प्रशासन नाही घेतली तर विदर्भ राज्य आंदोलन समिती व विदर्भ राज्य युवा आघाडी तीव्र आंदोलन करणार.