महिलांच्या सुरक्षेतेसाठी कडक कायदे अंमलात आणण्याची गरज:- जि. प उपाध्यक्ष रेखाताई कारेकर

Bhairav Diwase
भाजप महिला आघाडी चिमूर तालुका वतीने शासनाला दिले निवेदन.
Bhairav Diwase.    Oct 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:-  महाराष्ट्र राज्यात वाढते अत्याचार महिला वर्गावर होत असताना राज्यातील महाविकास आघाडी शासन सुस्त आहे महिला असुरक्षित असून राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षा साठी कडक कायदे अंमलात आणणे आवश्यक असल्याचे सांगत कडक कायदे करण्याची मागणी जि. प उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर यांनी केली असून राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले 
      
राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार कोवे चिमूर मार्फत निवेदन देत असताना जीप उपाध्यक्ष रेखाताई कारेकर भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष गीता लिगायत  चिमूर विधानसभा भाजप महिला संयोजिका तालुका महामंत्री ज्योती ठाकरे   पस माजी सदस्य माया ननावरे ,नगरसेवक भारती गोडे , आशा मेश्राम सरपंच ममता गायकवाड ललिता चौधरी प्रिया जयकर  नाजमा शेख  अलका बोरतवार आदी उपस्थित होते