वंचित बहुजन आघाडीने दिला फुटाना गावात स्वछतेचा कानमंत्र.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- 
         " जल हेच जीवन आहे " पान्याविना नाही प्राण, 
पाण्याचे तु महत्व जान. 
               वरील म्हनी प्रमाने मानवी जीवनात पाण्याचे महत्व खुप मोठे आहे.दीवसाच्या सुरवातिपासून तर रात्रिपर्यंत पाण्याचा वापर दैनंदिन जीवनात केल्या जातो. परंतु पिन्याचे पानी हे जर शुद्ध नसेल तर मानवी आरोग्यावर त्याच विपरीत परिणाम होत असतात .व त्यातुनच कालरा, अतिसार, उल्टी, हे गंभीर आजार उद्भवत असतात.म्हनुनच या गोष्टी होऊ नयेत व समाजाचे आरोग्य अबाधित राहावे या करिता गावतील रस्ते,नाली,पिन्याचे विहिर, इत्यादि बाबी स्वछ असायला पाहिजे या विचाराचा ठेवा मनात जपत वंचित बहुजन आघाडीचे पोम्भूर्णा तालुका माहासचिव रविंद्रजी तेलसे यानी फुटाना गावतील विहिरी शेजारील केरकचरा साफ करीत जनु सामाजिक बांधीलकीसाठी आपन सदैव तत्पर आहोत याचे उत्तम उदाहरण सिद्ध केले. त्यांच्या या कार्यात बौद्ध समाज फुटाना चे अध्यक्ष कपिलदास जी वनकर,रूपेश वनकर, प्रवीण पौरकर, मुन्ना दूधे इत्यादि कार्यकर्त उपस्थित होते.