(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- मागील 2 दिवसापासून चंद्रपूर जिल्हा सह बल्लारपूर शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील शिवाजी वॉर्ड येथील महात्मा जोतीबा फुले महाविद्यलय समोरील श्री संजय राजाराम डुंबेरे यांच्या साॅ मिल मधे असलेल्या जुन्या गोडामाची भिंत कोसळली बाजूच्या इमारती मधील वास्तव्यास असलेली श्रीमती मिराबाई कटकंदिवार वय-६८ वर्ष यांचा भिंत कोसळल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. #Death
सूत्रांच्या माहितीनुसार सदर घटना आज रात्री 12:30 च्या दरम्यान घडली असून या घटनेचे वृत्त कळताच बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईचंवार, पोलीस उपनिरीक्षक तिवारी, तलाठी खरुले, अजय मेक्कलवार ज्येष्ठ सहायक, संजय डुंबेरे, विशाल डुंबेरे, सामाजिक कार्यकर्ता व नगर सुरक्षा दल ची टीम उपस्थित होती. या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेच्या पश्चात पती व दोन मुले आहे.