डॉ नितीन पोटे निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखणीतून.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोना ही एक महामारी आहे, ते वुहान या शहरातून पूर्ण जगात पसरलंय हे आता सांगायची गरज राहिलेली नाही, तरी पण काही अंगठेबहादूर अडाणी लोक व्हाट्स अँप, फेसबुक, youtube युनिव्हर्सिटी उच्च शिक्षित लोकांनी समाजामध्ये स्वतः च्या फायद्या साठी विष पेरण्याचे काम केले आहे.त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक व कोरोना योद्धे यांच्या नात्यामध्ये फार मोठी दरी निर्माण करण्याचे काम या समाजकंटकांनी केले आहे गैसमज नंबर
1) मेल्यानंतर डॉक्टर ला दीड लाख रुपये मिळतात म्हणून डॉक्टर मुद्दाम रुग्णांना मारीत आहेत
2) रुग्ण मेल्यानंतर लिव्हर, किडनी काढून विकतात.
त्यावर स्पष्टीकरण - महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांच्याकडे एवढा पैसा नाही कि, ते मृत रुग्णामागे दीड लाखये देतील, इथे कोरोना योद्धे यांचीच वेळेवर पगार होत नाही तर दीड लाख रुपये कुठून देणार हा गैरसमज कोण, कसा, व का पसरवला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, एखादा कोरोना बाधित रुग्ण मेल्यानंतर त्याचे कोणतेच अवयव कामी येत नाही, कोणत्याही कोरोना बाधित रुग्नाचे शव विच्छेदन करण्यास मनाई आहे व मृत देहापासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी मृत देहाची विशिष्ट पद्धतीने पॅकिंग केली जाते म्हणून त्यांचा अंतिम विधी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार कोरोना बाधित रुग्णाचे मृत देहाचे अंत्यविधी करण्याची जवाबदारी संबधित महानगरपालिके कडे देण्यात आली आहे, परंतु लोकांनी असा गैरसमज पसरवला कि मृतदेहाचे अवयव काढतात ही बाबनिंदनीय आहे,.
सद्या व्यैद्यकीय क्षेत्रावर एवढा ताणतणाव वाढला आहे कि, कोरोना वॉर्ड मध्ये काम करणारे डॉक्टर, सिस्टर व आरोग्य कर्मचारी 6 महिन्यापासून घरी गेलेले नाही, ना आम्ही घरी बघितलं ना आम्ही आईवडील बघितले आम्ही कोरोना योद्धे कोरोनाशी आजही सैनिकासारखे जीवाचं रान करून लढा देत आहोत. कोरोना वॉर्ड मध्ये काम करीत असताना ज्या वेळेस PPE किट घालतो त्याच्या 2च मिनटानंतर घाम यायला चालू होतो आणि डोक्यावर जर फेस शिल्ड घातली घातलीकि 10 मिनिटांनी श्वास घ्यायचा त्रास होतो ज्यांना विश्वास वाटत नाही त्यांनी एक वेळेस PPE किट घालून 8 तास ड्युटी करुन दाखवावी, तर विचार करा आम्ही रोज 8 -8 तास किट घालून निःस्वार्थ 6 महिन्यापासून रुग्ण सेवा करतो हे काय कमी आहे ?
सद्या चुकीच्या माहितीमुळे व अर्धवट माहिती असल्यामुळे कोरोना योद्धेच धोक्यात आले आहे. पूर्ण भारत भार 383 डॉक्टर कॉरोनच्या युद्धात शाहिद झाले आहे. रोज कोणी ना कोणी कोरोना योद्धा कोरोना पॉसिटिव्ह येत आहे शाहिद होत आहे पण आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता तुमच्यासाठी एवढा योगदान देत आहोत हे का कमी आहे. वरतून दीड शहाणे लोक मेलेला रुग्ण ज्याचा Ecg फ्लॅट आहे धमकीच्या जोरावर नको ते घाणेरद्या शिव्या देऊन त्याचे तापमान मोजा म्हणतं आहे मूर्ख पणाचा सर्व सीमा पार केल्या आहे या लोकांनी. कोरोना हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे हे मागील 6 महिन्यापासून समजावून सांगून सुद्धा लोक बिनकामी फिरताना दिसत आहे, त्यामुळे कोणाला कधीही काहीही होऊ शकतंय हे बाब लक्षात ठेवावीं. फक्त अज्ञानामुळे लोकांना असं वाटतंय कि, आमचा रुग्ण आता चांगला होता आणि आता कसा मरण पावला, त्याला तशी कोरोना ची पॅथॉलॉजि पण आहे न. ज्या वेळेस सौम्य लक्षणे असतात त्यावेळेस कोणालाच काही त्रास होत नाही तो नकळत चांगला होऊन जातो पण ज्या वेळेस मध्यम प्रकारची लक्षणें असतात त्यावेळेस आपण रुग्णांना घेऊन दवाखान्यात घेऊन जातो पण त्या वेळेस रुग्ण हा मध्यम कडून गंभीर स्वरूपात मध्ये जातो परिणामी रुग्ण दगावतो. ज्या वेळेस रुग्ण icu वॉर्ड मध्ये भरती होतो त्याचवेळेस जे काही प्रोटोकॉल आहेत त्यानुसार उपचार सुरु केले जातात, मेडिसिन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर इत्यादी लावले जाते. चंद्रपूर येथील संपूर्ण दवाखान्यात CCTV कॅमेरा बसवलेले आहेत व मा. जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले राजपत्रित अधिकारी त्याची 24 तास निगराणी करीत असतात. त्यामुळे डॉक्टर, सिस्टर, आरोग्य कर्मचारी हे सर्व आपली ड्युटी बरोबर करत असतात परंतु ज्या वेळेस शंभर लोक रुग्ण आमचा कसा मरण पावला म्हणून कोरोना योध्याच्या अंगावर धावून येतात त्यावेळेस जीवाच्या भीतीने अक्षरशः बाथरूम मध्ये लपून बसण्याची वेळ येत आहे. याचा अर्थ असा नाही कि डॉक्टर चुकीचा आहे म्हणून लपून बसला आहे किंवा शंभर लोकांचा समूह जिंकला असे होत नाही. ही सर्वांची हार आहे ज्यांना कोरोना झालाय ते जीवाशी हारले आणि ज्यांनी उपचार केले तेही हारले. आम्ही कोरोना योद्धे तुमच्या मधील च एक आहोत आम्हाला ही घरदार आहे, संसार आहे, घरदार आहे, मित्र मैत्रीण आहे आम्हाला ही आमच्या जीवाची भीती वाटती. जर असेच हल्ले होत राहिले तर एक एक डॉक्टर नौकरी सोडून चालला जाईल व पूर्ण आरोग्य व्यवस्था *कोलमडून* जाईल. कालच आई बोलत होती सर्व सोडून घरी ये आम्ही तुला बसवून खाऊ घालतो सोडून दे नौकरी म्हणून पण मला माहित आहे मी जर नौकरी सोडली तर आरोग्य व्यवस्थेवर किती मोठा परिणाम होईल, मी म्हणजे मी एकटा नाही तर हजारो, लाखो डॉक्टर यांनी जर नौकरी सोडली तर रुग्णाची सामान्य नागरिकांची काय अवस्था होईल विचार करा !
*ज्या काळात सर्वांनी मिळून मिसळून कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ आहे त्याच काळात कोरोना ला न हरवता कोरोना योध्याला हरवतं बसला आहात*. जर कोरोना योद्धे हारले तर संपूर्ण भारत हारेल हे लक्षात ठेवा. लोकांनी कोणत्याच अफवांना बळी पडू नये ये युद्ध सर्व मिळून जिंकू, आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवावा. जगातल्या कोणत्याच डॉक्टर ला आपला रुग्ण मरावा असे वाटत नाही. आम्ही रुग्णाच्या शेवटच्या श्वासपर्यंत रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो. *आम्ही ही शेवटी माणूसच आहोत न देव नाही* आम्ही जेवढे प्रयत्न करतो तेवढा प्रतिसाद रुग्णांच्या शरीराने ही द्यायला हवा असतो हे लक्षात ठेवावे.
त्यामुळे सर्वांनी साठी द्यावी, कायदा कोणीही हातात घेऊ नये कोरोना योध्यांना मारहाण करू नये असे आव्हान चंद्रपूर येथील मा. अधिष्ठाता, मा. जिल्हाशल्य चिकित्सक व मा. वैद्यकीय अधीक्षक करीत आहे कोरोना योध्यावर हल्ला करणे हा महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम 2005 अननवे अजिमपात्र गुन्हा असून त्यात 3-10 वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षेची तरदूद आहे.
लिखाण - डॉ. नितीन पोटे
निवासी वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर